marathi suvichar : सुविचार मराठी : 1000 + suvichar marathi
कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे
धावलात तर हक्क दुर पळतात.
.
सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
.
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
.
सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.
marathi suvichar
.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
.
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
.
स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.
.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
.
माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.
.
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
.
marathi suvichar
आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,
माशाप्रमाणे, समुद्रात पोहायला शिकलो
पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?
.
यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.
.
आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
.
पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की,
ते पाप आहे असे माहीत असूनही
आपण त्याला कवटाळतो.
.
marathi suvichar
मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
.
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,
पण संकटाचा सामना करणं,
त्याच्या हातात असतं.
.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
.
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका.
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
.
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.
.
marathi suvichar
माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते.
.
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
.
कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही;
मात्र मोर मेला तर आपण हळहळतो.
कारण सौंदर्य नष्ट होते.
.
मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.
.
नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.
.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?
.
marathi suvichar
अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे,
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
.
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
.
नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.
.
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही,
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
.
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती,
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून,
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.
.
marathi suvichar
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.
.
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.
.
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका.
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
.
न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करणाऱ्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.
.
marathi suvichar
प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.
.
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
.
जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
.
जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.
.
नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.
.
आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
.
गरूडाइतके उडता येत नाही,
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
.
marathi suvichar
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
.
आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
.
टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
.
कडू घोट प्रेमळ माणसाच्या
हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.
.
कासवाच्या गतीने का होईना,
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
.
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
.
मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी मनुष्य
अधिक शोभून दिसतो.
.
marathi suvichar
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते
ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात
एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
.
प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही
प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून.
.
थोडे दुःख सहन करुन,
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर,
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.
.
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन
कधी येईल सांगता येत नाही.
.
भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;
त्याची खपली काढू नये.
.
प्रसिध्दी ही अशी बाब आहे,
जी कितीही मिळाली तरी,
माणसाची तहान भागत नाही.
.
marathi suvichar
स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
.
आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
.
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
.
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
.
बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
.
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
.
marathi suvichar
मोठी स्वप्ने पाहणारेच,
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
.
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
.खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.
.
परीक्षा म्हणजे स्वत:च्या
आत डोकावून पाहण्याची संधी !
.
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही
असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
.
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
.
जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
प्रयत्न करीत असालं तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,
तुम्ही किती असामान्य आहात.
.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
.
यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,
पण समाधान हे महाकाठीन,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
.
प्रत्येक पाऊल योग्य नसते,
पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात
ते धेय्य नक्की गाठतात.
.
जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !
.
हृदये परस्परांना द्यावीत,
ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
.
यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,
पण समाधान हे महाकाठीन,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
.
तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
.
आपलं जे असतं ते आपलं असतं
आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
.
शत्रूने केलेले कौतुक
हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
.
न मागता देतो तोच खरा दानी.
.
तिरस्कार पापाचा करा;
पापी माणसाचा नको.
.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
.
प्रत्येकाच्या मनात एक
आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
.
चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.
.
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
.
केवड्याला फळ येत नाही पण
त्याच्या सुगंधाने तो
अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
.
जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
.
यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
.
आपण कसे दिसतो यापेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
.
चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
.
निश्चयी भिकारी हा अनिश्चयी
सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.
.
जशी दृष्टी तशी सृष्टी.
.
सत्तेशिवाय शहाणपन काय कामाचे!
.
यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.
.
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
.
मित्र परिसासारखे असावेत
म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
.
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस !
.
निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे.
.
आपण जे पेरतो तेच उगवतं.
.
छंद आपल्याला आयुष्यावर
प्रेम करायला शिकवतात.
.
आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो.
Read more :